आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते.
अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. 
रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने तयारी केली आहे. त्यामुळे कुठूनही मतदान करता येणं शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यांकडून याबाबत मतं मागवली आहेत. 31 जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात यावरचं मत राज्यांना द्यायचं आहे. तर 16 जानेवारीला 8 राष्ट्रीय पक्ष आणि 57 प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.