मारेगाव : आज देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने साई मित्र परिवार मारेगाव तर्फे दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी भव्य रक्तदान आयोजित करण्यात आले.
शिबिरात ९१ रक्तदत्त्यांनी सहभाग घेतला असून ३.३० वाजेपर्यंत हे शिबीर यशस्वी पार पडले. चार पाच दिवसापासून वरूणराजाची रिपरिप सुरु आहे, तरी देखील साई मित्र परिवाराने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आपली परंपरा कायम ठेवत शहरात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी, यवतमाळ यांच्या सौजन्याने पार पडले.
या अमृतमहोत्सवी व गुरुपौर्णिमा अनुषंगाने सर्व रक्तदात्यांचे साई मित्र परिवार मारेगाव तर्फे आभार मानण्यात आले आहे.