मारेगाव : तालुक्यातील खडकी येथील माणिक जिवतोडे या शेतकऱ्याचे वावरातील पराटीचे 35 ते 40 झाडे उपडून नासधूस केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
माणिक पांडुरंग जिवतोडे यांची शेती मारेगाव तालुक्यातील खडकी येथे असून त्यांनी वावरामध्ये पराटी पिकांची लागवड केली. मात्र, पावसाने दुबार पेरणी चे संकट त्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली. यातून कसे बसे सावरत असतांना त्यांचे शेतातील अज्ञात इसमाकडून कपाशी या पिकांचे नासधूस केल्याचे प्रकार निदर्शनास आला.
अतिवृष्टीमुळे आधीच हतबल असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा अज्ञात विकृती कडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नासधूस करणाऱ्या इसमाविरोधात कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी करित आहे.