नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर
महागांव : शासनाच्या शैक्षणिक ध्येय धोरणानुसार, 30 विद्यार्थी पटसंख्येच्या मागे 1 शिक्षक असावं या पद्धतीच शैक्षणिक धोरण निश्चित असताना पुसद विधानसभा मतदार संघातील, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ शेवटचे टोक असलेले महागाव पंचायत समिती अंतर्गत डोंगराळ भागातील आदिवासी बहुल बंजारा तांडा, (कोनदरी) या गावामध्ये सध्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये वर्ग १ ते ५ असून, एकूण पटसंख्या 212 विद्यार्थ्यांची असताना देखील केवळ दोनच शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामध्ये एक शिक्षक व दुसरे सहाय्यक कंत्राटी, शिक्षक असुन वेळोवेळी शिक्षकांकरिता गाव पातळीवरून मागणी झाल्यानंतर 2021 -- 22, हे शिक्षक उपलब्ध झाले. अन्यथा संपूर्ण शाळेचा शैक्षणिक ज्ञानदानाचे कारभार हे केवळ एकच शिक्षकावर अवलंबून आहे व दैनंदिन इतर तालुका स्तरावरील प्रशासकीय शैक्षणिक मीटिंग, इतर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजाच्या बैठकी व शैक्षणिक कामकाज शालेय मध्यम पोषण आहार त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना धडे देण्याचे काम चालू असून या गावांमध्ये मागील 10 वर्षापासून उच्च श्रेणी पद रिक्त आहे.
शासनाच्या शिक्षण विभागाच्या विद्यार्थी पटसंखेच्या ध्येय धोरणानुसार या गावाला (6 + 1) असे एकूण शिक्षक पदसंख्या असणे अपेक्षित व क्रमप्राप्त आहे ही वरील पदे या शाळेला मंजूर असून हे गाव डोंगराळ भागात असल्यामुळे शहरी आसरा शोधणाऱ्या नव्या पिढीच्या शिक्षकांना येथे रुजू होण्यास फारसं स्वारस्य नसतो अशा गावात रूजू होण्यास नकार देतात. या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता (5) पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचं पोखरी या गावामध्ये शाळेत प्रवेश निश्चित केला या बालवयात प्राथमिक शिक्षण हे गावातच मिळायला हवं पण दुर्दैवाने या बाल वयात त्यांना दररोज 10, किलोमीटर स्वखर्चाने ये -- जा करून शिक्षण घ्यावं लागत आहे, या शाळेला उत्पन्नाचे साधन म्हणून 11, हेक्टर शेतजमीन पण हराशी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे शाळा च्या सादिल खर्चासाठी आर्थिक स्रोत मिळणे बंद आहे.
पंचायत समिती महागाव शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार या महागाव पंचायत समितीत, 250 शिक्षकांची आज रोजी गरज असून आदिवासी बंजारा तांडा वाडी वस्तीवर शिक्षण व्यवस्था शिक्षकां अभावी ही पूर्णतः कोलमडलेली असून या अभावात जगणाऱ्या या बंजारा, आदिवासीबहुल भागातील तांडा वाडी वस्तीवरील शैक्षणिक गुणवत्तेवर न बोललेलंच बरं. शासनाचा गले लठ्ठ पगार घेऊन आपल्या कर्तव्यात काम चूकारपणा करून निवासी न राहता निवासी भत्ता घेणे अधून मधून शाळेला दांडी मारणे, ग्रामीण विभागातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अत्यंत घसरलेला असून यामध्ये गत दोन दशकात अनेक पिढ्या गारद झाल्या शाळा व्यवस्थापन समिती केवळ कागदावर नामात्र असून शिक्षण व्यवस्थेची माती करणाऱ्या या बोथट व संवेदनाहीन यंत्रणा व व्यवस्थेला प्रश्न उपस्थित करून राज्यकर्ते जबाबदारी निश्चित करणार का? या ज्वलंत प्रश्नावर आढावा घेऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला यांना वेळ मिळणार की, नाही, केवळ प्रासंगिक प्रसंगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेंवर जाऊन सेल्फी घेऊन व्हाट्सअप वर वळवळ करत असतानाचे फोटो सध्या पुसद विधानसभा मतदारसंघात दृष्टिक्षेपात येतात पण अशा डोंगराच्या कुशीमध्ये होत असलेली विद्यार्थ्यांची शिक्षका अभावी होणारी कोंडी गैरसोय बघण्याकरिता ना स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, स्थानिक प्रस्थापित आमदारांकडे वेळ नाही, राज्यातील सध्याचे अस्तित्वात असलेले प्रचलित शैक्षणिक ध्येयधोरण ग्रामीण व शहरी अशा विषमतावादी बिज रोहण्याचं काम करत आहे शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांची स्पर्धेतील पीछेहाट, क्षमता बांधणी निर्माण होणे मोठे कठीण झाले आहे.
स्थानिक जिल्हा प्रशासनाने व पंचायत समिती कक्ष अधिकारी यांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन देऊन तातडीने या गावाला व पंचायत समितीला लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास या विधायक विषयाच्या मागणीला घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची भूमिका घेणार पंचायत समिती शिक्षणाधिकारी कडे निवेदन करताना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव, विशाल पवार जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना सचिव, सचिन राठोड, निलेश राठोड, आकाश राठोड, आदी गावकरी उपस्थित होते.