सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (११ सप्टें.) : मुदखेड तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, पिकांत पाणी पाणी असल्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यास मदत द्यावी, या मागणीचे निवेदन विधानसभा युवक काँग्रेसचे महा सचिव सुभाष धबडगे यांच्या नेतृत्वखाली भोकर दौऱ्यावर जात असताना बराड येथे पालकमंत्री तथा सा.बा.मंत्री अशोकराव चव्हाण यांना युवक काँग्रेस च्या शिष्टमंडळाने लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
यावेळी काँग्रेस कमिटी जिल्हा अधक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेस महासचिव सुभाष धबडगे, काँग्रेस करसल्लागार उतामराव लोमटे, श्रीनिवास महादवाड, भगवान कांजाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सार्वजनिक बांधकममंत्री अशोकराव चव्हाण यांनी पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसान ही चिंतेची बाब आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून, शासन स्तरावर मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले आहे.
यावेळी संजय सावंत, दादाराव पुयड, भास्कर कळणे, मल्हारि बल्लोड, राम कोडगिरे, शिवाजी खांडरे, बाबन पिंजारी, आदीसह शेतकरी उपस्थित होते.