सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
जेथे सर्व विचार करणे बंद करतात, तेथून जो विचार करतो, तोच खरा रणनीतीकार असतो. शिवसेनेत तसे रणनीतीकार असल्याचे या दोन्ही नगराध्यक्षांच्या निवडीतून पाहायला मिळाले. विरोधकांना मित्र बनवून व जंगोमला आलिंगन देऊन शिवसेनेनं दोन्ही नगरपंचायतेत सत्ता काबीज केली. राजकारण हे असच असतं, कोणताही पक्ष असो किंवा कोणतेही दल सत्तेसाठी सोबत घेऊन आपलं वाढवावं लागतं बल. नाहीतर संख्या जास्त असूनही विरोधात बसूनच वाजवावा लागतो ढोल. योग्य घडी असतांनाही आघाडी झाली नाही. कारण घडी मागे पडल्याने हाताला संधी मिळाली नाही. घडीकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हातही सुना पडला. मग हातावर कमान न ठेवता एकीकडे मजबूत खांदा तर दुसरीकडे जुन्याच मित्र पक्षाशी वादा करून सत्तेचा बाण चालविण्यात आला. फोडा नी राज्य करा, हा डावपेच सत्ता मिळविण्यासाठी आखला जात असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आले आहे. पण राजकारणात मात्र सर्वच काही जायज असतं. राज्यात एकमेकांवर आगपखाड तर स्थानिक पातळीवर युतीने होते सकाळ. त्यामुळे घडी, कमान असलेल्या हातांनाही रितं राहावं लागतं. दोन्ही नगर पंचायतीत पाच पाच उमेदवार विजयी झाले असतांनाही हाताला बळ आलं नाही. ऐन मोक्याच्या क्षणी हात ढिले पडले, व हातातून कमान निसटली. बाणाने दिशा बदलली, व कुठे जल्लोष तर कुठे सन्नाटा पसरला. प्रत्येक पातळीवरचं राजकारण सेम नाही, कोण कुठे जाईल याचा नेम नाही. त्यामुळे राजकारणाचे प्रत्येक डावपेच येणं या आधुनिक राजकारणात जरुरी झालं आहे. कारण संधीचं सोनं करणाराच चपळ राजकारणी असतो. नाहीतर मग वाट चुकली नी संधी हुकली म्हणण्याची वेळ येते.
शेवटी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राजकिय खेळी ठरली यशस्वी, शिवसेनेन अखेर मारली बाजी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 15, 2022
Rating:
