सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : 94 वे अ. भा मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे आज दि. 3-4-5 डिसेंबर 2021 ला कुसुमाग्रज नगरी MET भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
डॉ .जयंत नारळीकर हे संमेलनाचे अध्यक्ष असुन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. जावेद अख्तर समाजवादी विचारवंत शायर, कवी, गझलकार व अनेक नामवंत लेखकांनी येथे हजेरी लावली. प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत नियोजित अध्यक्ष गैरहजर राहिले. छगन भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून भिल्ल आदिवासींचा गौरव केला. ते म्हणाले की, आधुनिक भारताच्या इतिहासात 1857 चे बंड प्रसिद्ध आहे. या बंडात नाशिकच्या 700 भिल्ल बांधवांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. ते बंड भागोजी नाईकांचे बंड म्हणुन गाजले. ते बंड इंग्रजांविरुद्ध जसे होते तसे नव्या समाजरचनेसाठी होते. आदिवासींचा प्रश्न त्यातून पुढे आला. आदिवासी समाजाचे अस्तित्व या बंडातून अधोरेखित झालेले दिसून येते. 94 वर्षानंतर प्रथमच अ. भा मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात आदिवासी साहित्य दालनाचे उद्घाटन झाले.
गडचिराेलीच्या कुसुमताई अलाम आदिवासी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता यांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने विशेष निमंत्रण दिल्या गेले आहे.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच आदिवासी साहित्य, संस्कृती चा सन्मान !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 03, 2021
Rating:
