सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
खडबडा मोहल्ला येथील ईदगाहच्या मागील भागातून गोवंश जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काल मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी धाड टाकली. तेथे एक मालवाहू वाहन पोलिसांना उभे दिसले. पोलिसांनी त्या मालवाहू वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये १४ गोवंश जनावरे कोंबून होती. कत्तली करिता लगतच्या प्रांतात त्यांची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले. पोलिसांनी मालवाहू वाहन ताब्यात घेतले असून वाहन मालक व इतर काही जण घटनास्थळा वरुन पळुन गेले, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १४ गोवंश जनावरे व एक MH ३४ AB २४७८ हे मालवाहू वाहन असा एकुण 4 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता करत त्यांना रासा गोरक्षण संस्थेकडे देण्यात आले. गोवंश जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी म.प्रा.स.का. १९७६ अंतर्गत कलम ५(अ)(ब),९, ९(अ), प्रा.छ.अ. १९६० अंतर्गत कलम ११(१)(क)(घ)(ड)(च)(झ) व मो.वा.का. च्या सहकलम १३०, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, पीएसआय शिवाजी टिपूर्णे, पोउपनि हिरे, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना अशोक टेकाडे, गजानन भांदकर, हरिन्द्रकुमार भारती, पोकॉ. विशाल गेडाम, विजय राठोड, शुभम सोनुले, शंकर चौधरी, यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुदर्शन वानोळे व वणी पोलिस स्टेशन करीत आहे.