सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : अतिवृष्टीमुळे वंचित तालुक्यातील कुंभा वनोजा देवी मारेगाव या तीन मंडळांच्या गावाला लाभ देण्याची मागणी काँग्रेस कमिटी तथा आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडवेट्टीवार यांना करण्यात आली.नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरला जाऊन शिष्टमंडळाने मंत्री विजय वडवेट्टीवार यांची भेट घेतली. यासोबतच येथील परिस्थितीचीही माहिती दिली. यासह आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी त्यांच्यासोबत तहसीलचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.