सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
उमरखेड : सामान्य जनतेवर होणारा अन्याय कधीही खपवुन घेतला आणार नाही परंतु प्रत्येक मानसाने आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण ठेवुन मानवी हकाचे जतन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी उमरखेड येथे मानवी हक सुरक्षा परिषेदेच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. आज दि.१६ मार्च रोजी मानवी हक्क सुरक्षा परिषदेची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमरखेड तालुकाध्यक्ष श्री राजु बोंडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष श्री प्रशांत हरडपकर यांनी मानले.
घटनेतील विवीध कलमान्वये प्रत्येक व्यक्तीला समतेचा, स्वातंत्र्याचा व्यवसाय करण्याचा धार्मीक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
या बैठकीला मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेश कार्यकारी सदस्य परशुराम पोटे, मारेगाव तालुका अध्यक्ष अमोल कुमरे, विदर्भ कार्यकारिणी सदस्य वेणूदास हुसूकले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम काकडे, नवनियुक्त उमरखेड तालुका अध्यक्ष राजु बोंडगे, उपाध्यक्ष संजय भंडारे, सचिव आकाश लोमट, उमरखेड शहर अध्यक्ष प्रशांत हरडपकर, उपाध्यक्ष आत्माराम सुरोशे, सचिव शिशिर गीरी, सहसचिव किशोर बोरगडे, संपर्क प्रमुख नानाराव खापरे, राहुल कोळपे, रत्नदीप पाईकराव, विष्णू गोरे, अवधूत खडकर, बाबा उर्फ आनंद शिंदे, प्रविण सुर्यवंशी यांच्यासह मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मानवी हकाचे जतन करा - राजु धांवंजेवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 16, 2025
Rating: