सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
राळेगाव : तालुक्यातील खैरी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे अंत्य संस्कार व त्या मार्गाने जाणाऱ्या शेतकरी बांधवाना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
नव्याने बांधण्यात आलेला पुल अवघ्या पंधरा दिवसांत नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजुने मोठमोठे खड्डे पडले असुन शेवटी स्मशानभूमिकडे प्रेतयात्रेला तसेच त्या मार्गाने ये-जा करणाऱ्यासाठी शेतकऱ्यांना शेवटी नाल्याच्या पाण्यातुनच जावे लागत आहे.
परिणामी पुलाचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात पुलाच्या दोन्ही बाजुच्या भागात मोठमोठे खड्डे पडले असुन नागरिकांना जाण्यायेण्यास अडचण निर्माण होत आहे, असे बोलल्या जातं. विशेष म्हणजे पावसाळ्यात स्मशानभूमी व त्या मार्गावरील शेतकऱ्यांचा मार्ग सुकर होण्याकरिता हा पुल आमदार फंडातून बांधण्यात आला होता.
नव्याने बांधलेला पुल गेला पुराच्या पाण्याने वाहून
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 08, 2024
Rating: