सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यात सद्यास्थितीमध्ये रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून शेतात चना, मिरची व इतर पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतू संबंधित विभागाकडून भारनियमन चालु केले असून ते कोणत्याही वेळी हा वीज पुरवठा खंडीत करून कधीही बंद करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके कोलमडून पडत आहे. असा आरोप तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांनी आज मंगळवारला दिलेल्या निवेदनातून केला आहे.
गावठाण फिडरला सुद्धा भारनियमन लावून सामान्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा ट्रान्सफार्मर देण्यात आले नाही. त्यामुळे येत्या ८ दिवसात भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना मुबलक विज पुरवठा करावा. त्याचबरोबर मागण्या केलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर, विद्युत पोल व इतर सुविधा देण्यात याव्या, असे देखील निवेदनात नमूद असून वरील सर्व मागण्या आठ दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा गर्भीत ईशाराही मनसेचे रुपेश ढोके यांनी दिला.