सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : वणी-मारेगाव या राज्य महामार्गांवरील असलेल्या गौराळा चुनखडी खदानीतून चुनखडी ओव्हरलोडिंग वाहतूक वाहनांमुळे खदानी नजीक महामार्गांवर चिखल साचल्याने याठिकाणी अपघात घडत आहे. अशा आशयचे निवेदन वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक व्यवस्थापक चुनखडी यांना देण्यात आले.
मारेगाव-वणी राज्य महार्गावर गौराळा चुनखडी खदानीतून टिप्पर ओव्हरलोड चुनखडी भरून भरधाव वाहतात. मात्र, त्या वाहनावर ताडपत्री वरुण झाकल्या जात नाही, परिणामी प्रवाशांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गांवर सुकलेल्या मातीच्या रेतीच्या कनामुळे वाहने चालवणे मोठे जिकरीचे झाले असून, वाहन धारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन आज गुरुवार दि.5 ऑक्टोबर ला संबंधित व्यवस्थापकाला नमूद समस्या दूर करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. येत्या 7 दिवसात उपाययोजना न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल,असा निवेदनातून गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.