संविधानाने दिले सर्वाना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार - उपायुक्त माधुरी मडावी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत समाजातील सर्वच जाती धर्माचे लोकांना स्वाभिमानाने, स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार प्रधान केलेला आहे. संविधान आहे म्हणून सर्वाना संरक्षण मिळत आहे. असे प्रतिपादन अमरावती येथील उपायुक्त माधुरी मडावी हे स्थानिक सिद्धेश्वर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीराव फुले यांची संयुक्तपणे जयंतीचे निमित्ताने बोलत होत्या.

या कार्यक्रमात माजी सैनिक महेंद्र लोहकरे, राजकुमार मोहिते, मधुकर पिल्लारे, भीमराव शिंदे, किसनराव गवई व विरपत्नी शोभाताई लक्ष्मण साहेब आंबेडकर आले. या वेळी डॉ. ज्ञानेश्वर गोरे. उदघाटक साहित्यिक बाळासाहेब गावंडे हे होते सुनीता काळे, मनीषा तिरणकर, संजुताई गभने, समितीचे अध्यक्ष नरेंद्र उज्जेणकर, यांनी देखील उपस्थिताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष पवनकुमार आत्राम सूत्रसंचलन केशवराव मुनेश्वर यांनी,तर आभार प्रज्ञा वानखडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता उत्सव समितीचे आयोजक प्रकाश राऊत, महेंद्र लोहकरे, प्रदीप करमणनकर, जवाहर जयस्वाल अशोक भानारकर, राजकुमार मोहिते, निलकंठ नक्षणे, गजानन कोटनाके, संजय मुंदे, अशोक मसराम, अविनाश मैनदळकर, सचिन राजगडे, गजानन विरुटकर, दिलीप टेकाम, प्रकाश बड्डे, गजानन कोटनाके, राजेश प्रजापती, राजू कुडमेथे, गोविंद राठोड, भास्कर मिलमिले. भारती कुमरे, काजल वानखडे, अॅड. प्राची निलावार, सुमेधा पिलावान, पुष्पा परेकर, रेखा टेकाम, तलाषा पराते, इत्यादीनी परिश्रम घेतले.