कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर
वरोरा : आपल्या कार्यकर्तुत्वाने शहर व गावाचा विकासात योगदान देत समाजिक व राजकीय क्षेत्रात उतूंग भरारी घेतलेल्या मान्यवरांचा आज "सकाळ अयडॉल्स ऑफ महारष्ट्र" पुरस्काराने गौरव करण्यात आला.सदर पुरस्कार होटेल सेंटर पॉइंट,नागपुर येथे माजी मंत्री व भाजप प्रदेशअध्यक्ष-श्री.चंद्रशेखरजी बावनकूळे,माजी मंत्री-श्री.सुनील केदार,नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व अन्य मान्यवरांचा उपस्थितीत श्री.अहेतेशाम अली-माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजप यांना "सकाळ आयडल ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मागिल कित्येक वर्षापासून गोर-गरीब विधवा महिलांना मदत,रुग्णासाठी सतत केलेली मदत,समाजसेवेचा भावनातुन नेहमी लोकांचा कामासाठी धाऊन जाण्याची प्रवृत्ती,कोरोना काळात रुग्णासाठी गोर-गरीब लोकांसाठी केलेली सेवा,सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमात नेहमी सहभाग,अशा अनेक समाजासाठी अमुल्य योगदान आणि त्यांचा यशोगाथा समाजापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सर्वाची आहे. त्या अंतर्गत अहेतेशाम अली यांचे मान्यवरांचा हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
या प्रसंगी श्री.चंद्रशेखरजी बावनकूळे यांनी आपल्या संभाषणात म्हटले की,शासनाचा निधी वर अवलंबुन न राहता स्वता:चा कर्तव्याने वेगळे काही करून दाखवण्याची क्षमता असणाऱ्या लोक हेच खरे पुरस्काराचे मानकरी आहे असे मत व्यक्त केले. या पुरस्काराच्या निमित्ताने भाऊंचे शाल पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. काकडे ताई, सुषमा कऱ्हाड ताई, किर्ती कातोरे, सुजाता दुर्गेपुरहित, शुभांगी निंबाळकर, मधुसुधन टिपले, शरद कातोरे, प्रमोद धवस
यांचेसह वरोरा वासियांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.