सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील आैेद्याेगिक नगरी म्हणुन आेळखल्या जाणा-या बल्लारपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे माेलाचे योगदान देणा-या सामाजिक कार्यकर्त्या श्रुती लोणारे व बल्हारपूरच्या रुचिका बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तदवतचं सामाजिक कार्यकर्त्या सुमन कळसकर यांना काल भारत समाज भूषण पुरस्कार बहाल करण्यांत आला. येथील स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात शुक्रवार दि.१७ डिसेंबरला राष्ट्रीय उपाध्यक्ष मानवाधिकार सहायता संघाचे शतेद्रजी शर्मा यांच्या हस्ते त्यांना भारत समाज भूषण पुरस्कार देवून गाैरविण्यांत आले.
या कार्यक्रमाला मानवाधिकार सहायता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनु सिंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवि धारणे महाराष्ट्र प्रमुख कल्पेश व्यास चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल बटखल, बल्लारपूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष रोहन कळसकर, बल्लारपूर तालुका कार्याध्यक्ष राहुल रामटेके, महासचिव मोहम्मद सादिक मोहम्मद सलीम, शुभम पगारे, केशव मेश्राम, सुरेश मेश्राम, प्रदिप माडंवगरे, केशवराव मेश्राम, इत्तर पदधिकारी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.