बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे हा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगिकारला पाहिजे - प्राचार्य हेमंत चौधरी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव इथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना प्राचार्य हेमंत चौधरी म्हणाले की, बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगिकारला पाहिजे असे मत व्यक्त केलं.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.