संशयावरुन बेदम मारहाण प्रकरणात "त्या "वनकर्मचा-यांवर अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडाेबा बफर झाेनला लागून असलेल्या चिचाेली गावातील काही व्यक्तींना वनविभागाच्या कर्मचारी वर्गांनी संशयापाेटी बेदम मारहाण केल्याची घटना दि.२४ नाेव्हेंबरला घडली हाेती. दरम्यान या घटनेसंदर्भात दुर्गापूर पाेलिस स्टेशनला मारहाण झालेल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली हाेती. त्या संदर्भात काही कर्मचा-यांवर अट्रॉसिटी चा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. वनविभागाच्या अन्य काही कर्मचा-यांची देखिल चाैकशी सुरु झाली असल्याचे वृत्त आहे.

 सदरहु प्रकणात निर्दाेष व अन्याय झालेल्या व्यक्तींना याेग्य न्याय मिळावा व जे काेणी अधिकारी व वन कर्मचारी या घटनेत जबाबदार असतील त्यांना निलंबितच नाहीह तर सेवेतून बडतर्फे करावे तसेच त्यांचेवर अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजू झाेडे व अॅड.फरहत बेग यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे कडे केली हाेती.
सदरहु मारहाण प्रकरणात आठ ते नव वन कर्मचा-यांचा समावेश असल्याचे बाेलल्या जाते.शिकारीच्या संशयापाेटी वन कर्मचा-यांनी चिचाेली गावातील काही व्यक्तींना अमानुषपणे मारहाण केली हाेती. सध्या या प्रकरणाची चाैकशी एसडीपीआे नंदनवार यांचे कडे साेपविण्यात आली असल्याचे समजते.