सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शहरातील पथदिवे काल बंद राहिल्याने शहरात सर्वत्र अंधार पसरला होता. कधी दिवसाढवळ्या सुरु राहणारे पथदिवे ऐन दिवाळीच्या पर्वावर काल रात्री बंद राहिल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून आली. दिवसा पथदिवे सुरु ठेऊन विद्युत खर्ची घालणारा विद्युत विभाग आता रात्री पथदिवे बंद ठेऊन विजेची बचत करू लागला आहे. विज बिल येत नसल्यागत दिवसाला पथदिवे सुरु ठेऊन नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळणारा विद्युत विभाग आता रात्रीला पथदिवे बंद ठेऊन शहरात अंधार पसरवू लागला आहे. दिवस रात्र पथदिवे सुरु ठेवल्याने विजेचे बिल जास्त आले की काय, अशी खमंग चर्चा शहरात ऐकायला मिळत होती. कित्येक दिवस पर्यंत दिवसाढवळ्या पथदिवे सुरु राहिले. कित्येकदा नगर पालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतरही पथदिवे बंद करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. वीज वितरण कंपनीने नगरपालिकेला वीज बिल आकारणे बंद केले की, काय अशा प्रकारे दिवसाला पथदिवे सुरु रहात होते. परंतु आता रात्रीला पथदिवे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आज शहरातील पथदिवे बंद राहिल्याने शहरात काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. ऐन दिवाळीत नागरिकांच्या वस्तीत अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप दिसून येत होता.
ऐन दिवाळीत शहरात पसरला अंधार, शहरातील पथदिवे लागलेच नाही !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 11, 2021
Rating:
