सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२२ सप्टें.) : कोरपना तालुक्यातील इरई येथील शेतकऱ्यांच्या शेतकपिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनसडी यांच्या कार्यालयात शेतक-यांनी भेट देऊन वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे संरक्षण व्हावे याकरिता वनविभागातर्फे सोलर बॅटरी मशीन मंजूर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांना केली.
कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानटी डुक्कर, रोही यासारख्या वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे, तसेच शेतकऱ्यांना सदरहु बाबींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालांची राखण करण्यासाठी रात्रपाळी मध्ये जागरण करून वन्यप्राण्यांपासून आपल्या शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. तसेच शेतकऱ्यांसुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, युवा स्वाभिमान पार्टीचे कोरपना पंचायत समिती सर्कलचे अध्यक्ष निखिल पिदूरकर यांनी उपराेक्त बाबीची दखल घेत युवा स्वाभिमान पार्टी जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकऱ्यांसह वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सदर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन सादर केले. या शिवाय वन्यप्राण्यांचा त्रास असल्याची माहिती निखिल पिदूरकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना या वेळी दिली.
आपण यासंदर्भात योग्य चौकशी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे याकरिता सोलर बॅटरी मशीन देण्यात यावी यासाठी उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर करू असे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी धनराज भगत, सुनील तेलंग, प्रवीण आत्राम, राजू वरारकर, बाळा गोहणे, शंकर झाडे, अखिल निखाडे, बाळू तेलंग, श्रीकृष्ण आत्राम आणि इतर नागरिक उपस्थित होते उपस्थित होते.
वन्यप्राण्यांपासून शेतपीकांच्या संरक्षणाकरीता सोलर बॅटरी मंजूर करा - युवा स्वाभिमान पार्टीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2021
Rating:
