सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (०७ सप्टें.) : बिलोली तालुक्यात 6सप्टेंबर पासुन मुसळधार पाउस चालुच आहे. या मुळे तालुक्यातील ९०% शेतकर्याचे शेतात पाणी घुसुन सोयाबीन,उडीद,कापुस,तुर ईत्यादी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. या मुळे शेतकरी वर्गात अंत्यत घबराटीचे वातावरण निर्मान झाले आहे.या मुळ शासनाकडे असलेल्या आतीवृष्टी पावसाच्या नोदी वरुन नुकसना भारपाई द्यावे व विमा कंपनीला १०० टक्के नुकासन भरपाई देण्याचे आदेश द्या असे, ईमेल द्वारे तक्रार वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य शंकर महाजन यांनी जिल्हाधिकार्याकडे केली आहे.
तसेच त्वरीत शेतकरी बाधवाना दिलासा देण्यासाठी हेक्टीरी पन्नास हजार नुकसान भरपाई पधरा दिवसात द्यावे.व तसेच विमा कंपनीला १०० टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावे. अशातच जांच्या घराची पडझड झाली अशानाही आर्थीक मदत द्यावे. आन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकर्याना सोबत घेउन प्रशासनाला घेराव घालण्यात येईल यात कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी आपण व आपले प्रशासन जबाबदार राहाल असा ईशारा वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य शंकर महाजन यानी दिले आहे.
या निवेदनाची प्रती मुख्यंमञी साहेब, विभागीय आयुक्त औरगाबाद, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार,तालुका कृषी अधिकार्याना देण्यात आले.