ईसापुर धरणाचा पाणी साठा 86 टक्के : नदी काठच्या गांवाना सावधानतेचा ईशारा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (५ सप्टें.) : आज दिनांक 05 सप्टेंबर रोजी इसापूर धरण 86 टक्के भरले असल्यामुळे विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव तर मराठवाड्यातील हदगांव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यातील नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा पूरनियंत्रण अधिकारी ईसापुर धरण यांच्या वतीने देण्यात आला आहे.
  
ईसापुर धरण जलाशय पाणी पातळी 439.54 मीटर झाली असुन, जिवंत साठा 829.18 दलघमी (86.01 %) झालेला आहे. सद्यस्थित्तित ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाउस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे.
त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापुर धरणाचा मंजुर जलाशय प्रचलन आराखडा (ROS) (90% विश्वासाहर्ता) नुसार दि.15 सप्टेंबर 2021 पर्यंत पाणी पातळी 440.85 मीटर 98.51% ठेवावी लागणार आहे. 
 धरण सूरक्षीततेच्या दृष्टीने ईसापुर धरणातुन वक्रद्वार (Spillway) द्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरीक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
   
संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होवु नये म्हणुन आपल्या तालुक्यातील पेनगंगा नदी काठच्या दोन्ही तिरावरील गावातील नगरिकांना आपली गुरेढोरे , घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवणे व नगरिकांनी सुरक्षित स्थळी राहणे बाबत आपल्या स्तरावरुन सुचना द्यावी अशी माहिती पूरनियंत्रण अधिकारी ईसापुर धरण तथा उपविभागीय अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प व्यवस्थापन एच.एस.धुळगंडे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील तहसीलदारांना दिली आहे.


नागरिकांनी सतर्क राहावे - तहसीलदार आनंद देऊळगावकर

ईसापुर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. आज रोजी धरण 86 टक्के भरले असून पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे त्यामुळे तालुक्यातील नदी तीरावरील गावकऱ्यांनी सतर्क रहावे अशा सूचना
पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांच्यामार्फत प्रत्येक गावात देण्यात आल्या आहे. सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. अशी प्रतिक्रिया लोकशाही वार्ता सोबत बोलताना तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी दिली.

Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना