सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४ ऑगस्ट) : रक्षाबंधन या नावातच रक्षा हा शब्द आहे. त्यामूळे प्रत्येक परिस्थितीत बहिनीची रक्षा करण्याचे हे बंधन असून राखीचा धागा हा केवळ दोरा नसून हे शील, स्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेेडच्या महिला आघाडीच्या वतीने आज मंगळवारी रक्षाबंधन व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाला चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, ग्रामिण विभागाच्या महिला अध्यक्षा सायली येरणे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, बहूजन आघाडीच्या महिला प्रमूख विमल कातकर, आदिवासी महिला आघाडीच्या वैशाली मेश्राम, बंगाली समाज आघाडीच्या सविता दंडारे, आशा देशमूख, नंदा पंधरे, शांता धांडे, वैशाली मद्दीवार, शाईन शेख, अनिता झाडे, अस्मिता डोनारकर, स्मिता वैद्य, हजारे, प्रेमीला बावणे, माधुरी निवलकर, कल्पना शिंदे, सिमा विलायतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेत सक्रिय महिला सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामूळे महिलांच्या समस्या सोडविण्याची मोठी जबाबदारीही या संघटनेवर आहे. संघटनेची महिला आघाडी उत्तमरित्या काम करत असून या संघटनेचा अध्यक्ष तथा येथील महिलांचा भाऊ म्हणून मी नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. ही एक संघटना नसुन परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक महिला ही आंनदी आणि निरोगी असली पाहिजे या दिशेने संघटना काम करत आहे. आजवर संघटनेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी स्वंतत्र व्यायाम शाळा असावी या दिशेनेही माझे प्रयत्न सुरु आहे.
राखीचा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहिण-भावाच्या नात्याचे प्रतिक आहे. ते एक शील, प्रेमळ, मायाच्या पवित्र्याचे रक्षण करणारे बंधन आहे. दिसायला छोटासा, मात्र दिसणाऱ्या धाग्या सोबत अनेक जणांची पवित्र मने जुळलेली असतात. त्यांच्या भावनांचा आदर करणारा व पिढ्या न पिढ्या बहिण-भावाचे नाते टिकवून ठेवणारा हा सण आहे. बहिण-भावाचे हे प्रेमळ नाते भविष्या मधील पिढ्यांमध्ये असेच टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने दर वर्षी येणारा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला पाहिजे. असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणातून केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या भगीनींनी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मनगटाला राखी चे पवित्र बंधन बांधून बहिनींचे रक्षण करण्याची ओैवाळणी स्वरुप मागणी केली. कार्यक्रमाला महिलांची विशेष उल्लेखनिय उपस्थिती होती.
चंद्रपूर नगरीत रक्षाबंधन व स्नेहमिलन कार्यक्रमाचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 24, 2021
Rating:
