श्री शिवशंभू प्रतिष्ठान समितीकडून राजगड रोप-वेच्या मंजुरीचा जाहिर निषेध


सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर 
पुणे, (ता. १४) : पुणे-पिंपरी-चिंचवड भागातील श्री शिवशंभू प्रतिष्ठान समिती गड-किल्ले संवर्धन कार्यात नेहमीच आपले योगदान देत आली आहे. समिती प्रमुख सुनिताताई चव्हाण, प्रदिपभाऊ बांद्रे, सुनीलतात्या पालकर यांनी दुर्गप्रेमी तरुणांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सध्याच्या "रोप-वे आडवा, किल्ले वाचवा" या मोहिमेला पाठिंबा देऊन, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर म्हणजे राजगडावरील रोप-वे साठी मिळालेल्या मंजुरीचा पुणे-पिंपरी-चिंचवड भागातील श्री शिवशंभू प्रतिष्ठान समिती जाहिर निषेध करीत असून याबाबत लेखी निवेदन मुख्यमंत्री उद्धवसाहेबांना देणार आहेत.
समितीचे सभासद स्वामीनाथ यादव, मनोज यादव, सुरज यादव, बाळासाहेब ननेवर, अमित भोसले, अतुलदादा खोपटकर यांची प्रमुख मागणी हिच आहे कि गडावर अनेक कामे करता येऊ शकतात, पण झालेली नाहीत. गडावर साफसफाई नीट होत नाही, प्यायला पुरेश्या प्रमाणात पाण्याची सोय नाही, गडावरील जुन्या ढसाळत चाललेल्या बांधकामाची डागडुजी करण्याची गरज जास्त आहे. 
समितीच्या महिला सभासद कोमल घाडगे, दिक्षा घाडगे, प्रणवी फावडे, स्वाती पांचाळ, प्रेमला पुजारी, साक्षी भुवड, प्राची जाधव, निवेदिता ठाकरे, योगिता मुसळे, शारदा मुंढे, यांच्या मागणीनुसार महिला-मुलींसाठी सोईसुविधा अपुऱ्या असून स्वच्छतागृहाची बोंब आहे.
रोप-वे ऐवजी स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरावर मागणी जोर धरत आहे.

Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना