Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

नवी दिल्ली : करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, इंग्लंडमध्ये पोलो खेळताना मधमाशी गिळल्यामुळे संजयचा मृत्यू झाला.

कारण मधमाशी त्याच्या घशात अडकली आणि घाबरल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. करिश्माने २००३ मध्ये संजय कपूरशी लग्न केले. त्यांना २ मुलेही झाली. पण लग्नाच्या काही काळानंतर दोघेही वेगळे झाले.

पंजाबराव डखांचा नवा अंदाज: राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांनी घ्या ही काळजी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

परभणी : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

7 जूनपासून पावसाची दमदार हजेरी
7, 8, 9 आणि 10 जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचे जोरदार सरी कोसळणार आहेत.
ज्यांना हळद लावायची आहे, त्यांनी आता लावणे फायदेशीर ठरेल.ज्यांना मुगाची पेरणी करायची आहे, त्यांनी लवकर पेरणी करावी, कारण लवकर पेरणी केलेल्या मुगाला चांगला उतार मिळतो. 

13 ते 17 जून दरम्यान पावसाचा कहर
13 ते 17 जून दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे
उडीद पेरायचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे, कारण जमिनीच्या 1-2 फुटांपर्यंत ओल गेलेली आहे

पावसाची ठिकाणं आणि तारखा
• नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगोळा, जळगाव – 3 व 4 जून रोजी पावसाची शक्यता.
• कोकण – पावसाच्या सऱ्या सुरूच राहणार.
• कोल्हापूर परिसर – 31 मे ते 7 जून दरम्यान पावसाच्या सऱ्या दिसून येतील.
• धुळे, नंदुरबार – 4 व 5 जूनला पुन्हा सरी येणार. 

शेतकऱ्यांसाठी सल्ला
पेरणीचा निर्णय स्वतःच्या जमिनीची ओल पाहून घ्या
जर जमिनीत ओल आहे, तर पेरणीला हरकत नाही. 
शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या सांगण्यावर न जाता स्वतः निर्णय घ्यावा, असं आवाहन डख सरांनी केलं आहे.
"मी स्वतः शेतकरी आहे. जमिनीला ओल असेल तर पेरणी यशस्वी होते हे मला ठाऊक आहे," असं पंजाबराव डख म्हणाले.

महत्वाचं
यंदा जून महिन्याच्या अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे..!

पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, पोलिसांवर कामाचा ताणही वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 9 मे रोजी राजपत्र जारी करून, पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार दिला आहे. 

या अटींवर मिळणार तपासाचा अधिकार

संबंधित हेड कॉन्स्टेबल पदवीधर असावा 
किमान 7 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी 
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथून 6 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे व परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 ग्रामीण भागातील पोलीस दलासाठी दिलासा 

शहरी भागात जरी अधिकाऱ्यांची संख्या समाधानकारक असली, तरी ग्रामीण भागात अपुऱ्या अधिकाऱ्यांमुळे तपास प्रक्रिया धीम्या गतीने चालते.अशा वेळी, प्रशिक्षित व पात्र हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे लहान-मोठ्या गुन्ह्यांचा प्राथमिक तपास सोपवण्यात येणार आहे.

 या निर्णयाचे फायदे

• वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल 
• गुन्ह्यांची उकल जलद गतीने होईल 
• जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढेल 
• पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारी आणि संधी मिळेल.

हा निर्णय पोलिस यंत्रणेसाठी गेमचेंजर ठरू शकतो!
न्यायप्रक्रियेचा वेग वाढेल, तपास कार्यात परिणामकारकता येईल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा गृहखात्याने व्यक्त केली आहे.

धाकधूक वाढली : मे महिन्यात १० वी-१२ वीचा निकाल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी झ्र बारावीच्या २१ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. १० वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुस-या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे. यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती.

यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (१० वी, १२ वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.

लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.

२१ लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी झ्र बारावीच्या २१ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. १० वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुस-या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे. यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती.

यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (१० वी, १२ वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.

लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.

शाळा कॉलेज शिक्षकांच्या उन्हाळ्यात सुट्ट्या रद्द!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत.

यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावे लागणार आहे. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, उन्हाळी सुट्टीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील. 

सुट्टीत करावयाची कामे:
•अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी, पडताळणी
•विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी, अद्ययावत करणे
•अपार (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) माहिती सुधारित करणे
•शाळेचे स्कूल मॅपिंग आणि भूगोलविषयक माहिती अद्ययावत करणे
•संचमान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणे
•विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग

सुट्ट्यांचे नियोजन फिसकटले

दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, यंदा सुरवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुट्टीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे. दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितांत नाराजीचा सूर उमटत आहे. 

अनुसूचित जाती जमातीच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी बाबत मंत्रालयात स्वंतत्र बैठकीचे आयोजन करा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

नागपूर : बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राज्य अनुसूचित जाती -जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची प्रत्यक्ष भेट घेवुन मागणी केली. 

राज्यातील अनुसूचित जाती जमाती आदिम जातीच्या भूमिहीन बेघर कुटुंबांनी महसुल व वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण केलेले असुन सदर अतिक्रमण जमीन त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचे साधन बनलेले असताना शेतीच्या अतिक्रमण जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न प्रशासकीय होत असताना त्याबाबत मुंबई मंत्रालयात एक स्वतंत्र बैठक आयोजीत कऱण्यात यावी. अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी नागपूर येथे जावून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या कडे केली. धर्मपाल मेश्राम यांच्याशी चर्चा करत असताना राज्यात विवीध जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेमार्फत अनुसूचित जाती-जमाती आदिम जमातीच्या समूहावर बेशुमार अन्याय होत आहे. 

यवतमाळ जिल्यात आदिम जमाती पैकी कोलाम समूहाच्या कब्जात असलेल्या महसुल व वन जमिनीवर शेतीचे अतिक्रमण आहे सदर जमिनी वन विभागाकडून निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरु असताना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी सुद्धा कोलाम समाजाची प्रशासकीय बैठक आयोजित करण्याची मागणी केली तसेच वाशिम जिल्ह्यात सुद्धा बिगर सातबारा शेतकरी संघटने च्यावतीने जिल्हा महसूल प्रशासनाकडे सुरु असताना जिल्हा महसूल प्रशासन अक्षम्य प्रमाणत दुर्लक्ष करीत असल्यामुळे तात्काळ मुंबई मंत्रालयात स्वंतत्र बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी राज्य अनुसूचित जमाती -जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या कडे केली. 

यावेळी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे युवा नेते रमेश मडावी उपस्थितीत होते. भाई जगदिश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते उपस्थितीत होते.


मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार...!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाची आजची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय, तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय

नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याची तरतूद मंजूर  
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.  
यानुसार, नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरीतील नगराध्यक्षांना बहुमताच्या आधारावर हटवता येणार आहे.  

‘अभय योजना’ लागू – मालमत्ता करावर दंड माफीची संधी

नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करावर आकारलेला दंड अंशतः माफ करण्यात येणार आहे. कर वसुली सुरळीत करण्यासाठी ही अभय योजना लागू केली जाईल.  

मालमत्तेच्या हस्तांतरण नियमांमध्ये बदल
स्थावर मालमत्ता हस्तांतर प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी नियमात सुधारणा केली जाणार आहे.  
यामुळे नगरविकास विभागांतर्गत कामे वेगाने होणार आहेत.

• इतर 4 महत्त्वाचे निर्णय

विधी व न्याय विभाग
चिखलोली-अंबरनाथ (ठाणे) येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन होणार. यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यात आली आहेत.

गृह विभाग
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्याच्या कोठडीत मृत्यू झाल्यास कुटुंबाला भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी. यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यास मदत होईल.

महसूल व वन विभाग
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीवेळी योग्य मोबदला मिळावा यासाठी निर्णय. "भूमिसंपादनाचा योग्य मोबदला व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013" च्या कलम 30(3), 72 व 80 अंतर्गत व्याज दर सुधारण्यात आले. मोबदला वेळेवर मिळाला नाही, तर त्यावर अधिक व्याज मिळणार.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग
लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू होणार. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.