Top News

मुद्रांक शुल्क माफ; विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.

घोषणा कोणी केली? 
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत 4 जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

• आता फक्त साधा कागद पुरेसा
यापुढे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त स्वसाक्षांकित अर्ज लिहून संबंधित तहसील कार्यालयात सादर करा, आणि तुम्हाला आवश्यक ते प्रमाणपत्र मिळेल.

• कोणाला होणार फायदा?
1. दहावी आणि बारावी नंतर प्रमाणपत्रासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना
2. अनेक दाखले लागणाऱ्या पालकांना
3.शासकीय योजना, शिष्यवृत्ती, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना

• त्वरित अंमलबजावणी
पूर्वी नव्या सरकारने हे शुल्क 100 वरून 500 रुपये केले होते, मात्र यामुळे सामान्यांना आर्थिक बोजा वाढल्याने निर्णय मागे घेण्यात आला. आता नवीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.

• नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
पालक आणि विद्यार्थी म्हणतात, "आता खर्च वाचणार! साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले सहज मिळतील!"

• आता अर्ज करा आणि वाचवा वेळ,पैसा
स्वसाक्षांकित अर्ज तयार करून तहसील कार्यालयात सादर करावा लागणार असून तेव्हा प्रमाणपत्र मिळणार.



Previous Post Next Post