वर्धमान फाउंडेशन तर्फे पाणपोईचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : उन्हाळा सुरू झाला की जीवाची लाही लाही होतं. त्याकरिता जीवाची तहान भागवण्यासाठी थंड पाण्याची नितांत आवशकता असते. हिच सामाजिक बाब लक्षात घेत वर्धमान फाउंडेशन च्या वतीने विविध ठिकाणी "पाणपोई" उभारण्यात आली आहे. 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ पाणपोई सुरू करण्यात आली असून वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.   
यावेळी राजू खिवंसरा, अनिल चिंडालिया, महावीर कटारिया, सुरेंद्र डुंगुरवार, नितीन मुथा, आशिष सिसोदिया, संजय बोथरा, संदीप बोथरा, अजित मुनोत, राजेश बोथरा, निलेश लोढा, रवि रिंगोले, रोशन कटारिया, व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार, पत्रकार परशुराम पोटे, महादेव दोडके, सागर मुने सह शहरातील अनेक प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.