"काय करावे" व "काय करु नये" याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सुचना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : जिल्हयात मागील ४ ते ५ दिवसापासुन तापमानात वाढ होत असुन उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये याकरीता "काय करावे" व "काय करु नये" याबाबत मार्गदर्शक सुचना यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमीत करण्यात येत आहे.

हे करावे :-

१. तिव्र उन्हात मुख्यतः दुपारी १२.०० ते ३.०० च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे.
२. पुरेसे पाणी पित राहावे.
३. फक्त हलक्या रंगाचे सुती कपडयाचा वापर करावा.
४. घरा बाहेर पडतांना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा.
५. मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे.
६. शिळे अन्न खाणे टाळावे.
७. उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपडयाने झाकावे.
८. शक्यतो दुपारी १२ ते ३ या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे.
९. चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे.
१०. भरपूर ओआरएस आणि लस्सी, ताक, लिंबूपाणी यांसारखी घरगुती शीतपेयांचे सेवन करावे.
११. प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.

हे करु नये :-

१. दुपारी १२ ते ३ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
२. गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.
३. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.

उष्मघात झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सुचना.

१. उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
२. व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे.
३. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे
४. उष्मघात झाल्यास ओल्या कपडयाने बाधीत व्यक्तींचे अंग थंड पाण्याने पुसुन काढावे.
५. व्यक्तीला ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे.
६. बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केन्द्रात घेऊन जावे. बाधित व्यक्तीला त्वरीत हॉस्पीटल मध्ये दाखल करुन उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरु शकते.