सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : हल्ली वाढदिवस आपण विविध प्रकारे साजरे होतांना पाहतोय, "बर्थडे आहे भावाचा" म्हणत वाटेल तेवढा खर्च करून नाव व प्रसिद्धी मिळवतो. जिकडे तिकडे बॅनर चा धुवाधार पाऊसच पाऊस...या दिनी मान्यवरांच्या हस्ते केक भरवणे, सर्वांच्या इच्छे प्रमाणे वैगेरे वैगेरे करित असतो. पण मात्र, समाजात असेही काही वाढदिवस साजरे होतात त्याची प्रसिद्धी तर सोडा, कुठलाही लवाजमा, अजिबात काहीच केल्या जात नाही. किंबहुना गाजावाजा न करता, अनावश्यक टाळून सामाजिक बांधिलकी जपत "बर्थडे" साजरे केले जातात. उदाहरणार्थ आशिष भाऊ खंडाळकर, यांचा 26 व्या वाढदिवस निमित्ताने अंगणवाडी व जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक सामाजिक संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, गावकरी विनोद चहानकर, दिलीप खंडाळकर, संजय देवाळकर, प्रफुल पाटिल, सुमित उरकुडे, शाम उरकुडे, विशाल ताजणे व मारोती उरकुडे आदी उपस्थित होते.