सह्याद्री चौफेर | राजू डावे
नांदेपेरा, मजरा व वांजरी पर्यंत रस्ता पूर्ण उखडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती फारच दयनीय झालेली आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारावी अशी मागणी केली जात आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील नागरिकाकडून बोलल्या जात आहेत.
तालुक्यातील बहुतांश ग्रामीण रस्त्यांची हिच स्थिती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीने या गंभीर समस्याकडे लक्ष घालून संबंधित विभागाला तातडीने उपाययोजना करण्यासाठी सुचना कराव्या व नांदेपेरा ते वांजरी सात किमी अंतराचा प्रवास सुकर करावा अशी मागणी होत आहे.