उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
सावली : तालुक्यातील जिबगांव साजा मध्ये अनेक गावांचा समावेश आहे,यामध्ये प्रामुख्याने नदीकाठच्या, उसेगाव.पेडगाव.सिर्शी. जिबगांव. परिसरातील गावात सलग पाचव्यांदा निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमुळे धान पिकास व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे., अजून जिल्ह्यात पालकमंत्री घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गाकडे कुणाचे लक्ष नाही. त्वरित गांभीर्यांनी लक्ष देऊन नुकसानीचा भरपाई देण्यात यावी,अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई चिमुरकर यांनी केली आहे.
मागील काही दिवसात घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गोसेखुर्द धरण 33 व संजय सरोवर धरण 4 दरवाजे उघडल्याने प्रचंड महापूर आलेला होता. त्यामुळे नदीकाठी गावांना पुराचा सामना करावा लागला आहे. उसेगाव.पेडगाव .शिर्सी जिबगांव अशा इतर गावापासून पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे सर्व परिसरामधील पिके पाण्याखाली गेलेली आहे. याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन शेत पिकांचा सर्वे करून त्याचे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई चिमुरकर यांनी केली आहे. यावेळी उपस्थित.मोतीरामजी चिमुरकर, पुरुषोत्तम चुदरी ग्रा.पं.संरपंच जिबगाव, बाळकृष्ण चुदरी, गणपत गेडाम, बापुजी भोयर.श्री.आकनुलवार साहेब ग्रामसेवक जिबगाव, उमकेश्वर चव्हाण तलाठी व गावातील शेतकरी उपस्थित होते.