सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.१६) : परराज्यातील बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकुन त्यांचे आर्थिक नुकसान तर केले जात आहेत, शिवाय या बोगस बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याने परिणामी शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावे लागत असून, आर्थिक विवंचनेने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
त्यामुळे परराज्यातील बोगस बियाण्यांना जिल्ह्यात विक्रीसाठी बंदी घालुन बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, मनसे तालुकाध्यक्ष आरिफ शेख, तालुका उपाध्यक्ष गणेश काकडे, मंगेश तोडसे, अमोल गेडाम, भूषण फरकाडे, पवन पचारे आदिसह मनसे सैनिक उपस्थित होते.