टॉप बातम्या

निर्गुडा नदी (गणेशपूर घाट) पुलाची झालेली दुरावस्था तत्काळ करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरालगत असलेल्या निर्गुडा नदी (गणेशपूर घाट) पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून पुलावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत. त्यामूळे सदर पुलावरून रहदारी करणाऱ्या नागरीकांच्या जिवीतास हानी पोहोचण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अशा आशयचे निवेदन वंचित बहुजन आघाडी वणी च्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी यांना आज शुक्रवारी (ता. ६) देण्यात आले. 

निवेदनात पुढे असेही नमूद की,सदर पुलावरील संरक्षण कठडेसुद्धा चोरीला गेल्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून केव्हाही अपघात घडू शकतो,त्यास संबंधित विभागाला जबाबदार असल्याचा आघाडी च्या वतीने म्हटलं गेलं आहे. 

त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी निर्गुडा नदीच्या (गणेशपूर घाट) पुलाची तातडीने दुरुस्ती करून होणारा पुढील अनर्थ टाळावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. जर दुर्लक्ष टाळाटाळ झाल्यास तर नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीला तीव्र आंदोलन पुकारावे लागेल असा, ईशारा ही निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभागावाला देण्यात आला आहे. 

निवेदन देताना तालुका अध्यक्ष हरीश पाते, अब्दुल गणी, प्रदीप मडावी, अब्दुल हनीफ, किशोर मून, शंकर रामटेके, मारोती पोटेकर, प्रतिभा ठमके, उत्तम मडावी, शारदा मेश्राम, रेष्मा भगत यासह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Previous Post Next Post