शेकडो निराधार महिला-पुरुष धडकले तहसील कार्यालयावर
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
झरी : निराधारांचे पैसे त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था शासनाने करावी, निराधारांची रक्कम वाढवुन ६०००/- रूपये करावी, दरवर्षी मागीतला जाणारा हयात असल्याचा दाखला पटवारी व कोतवाल यांच्या मार्फत मागविण्यात यावे, गावातील नविन निराधार लाभार्थ्यांचे फॉर्म गावातच भरून घ्यावे. यासाठी शासकिय कर्मचारी यांना सुचित करण्यात यावे व यासाठी महिन्यातील दिवस व तारखी निश्चित करून दयावे,व शेतकऱ्यांचा पिकविपा त्वरीत जमा करावा. अशा विविध मागण्या घेऊन निवेदन आज 11 जुलै 2024 रोजी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदन देताना उपसरपंच गोपाल मडावी (कारेगाव), पांडुरंग पोयाम (शिबला), अभिमन्यू बेलखडे (चिखडोह), यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो निराधार महिला, पुरुष अपंग निराधारांची यावेळी उपस्थिती होती.
वृद्धपकाळात शासनाने जी अल्पशी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करतात. तीच रक्कम काढण्यासाठी त्यांना बराच नाहक त्रास सहन करावा लागतो. अशावेळी बऱ्याच बँकेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहत नाही, बँकेत लाभार्थ्यांच्या खात्यात किती पैसे जमा झाले याची यादी सुद्धा लावल्या जात नाही. पैसे वाटप करण्याचे कसल्याही प्रकारचे नियोजन नाही, त्यातही वयोवृद्ध अनेक निराधार अख्खा दिवस माझा नंबर लागेल म्हणून वाट बघून थकून जातो. अशी निवेदन कर्त्यांची तक्रार असून झरी तालुका ग्रामीण, दुर्गम भाग असल्याने येण्याजाण्यासाठी वेळेवर वाहन मिळत नाही. त्यामुळे अनेक निराधार लाभार्थी खिशातून मजुरी देऊन मोटर सायकल आणतात. वय झालेले असल्याने आजाराच्या अनेक व्याधीने ग्रसीत लाभार्थी घरी गेल्यावर आजारी पडतात. त्यामधील बहुतांश रक्कम त्यांना दवाखान्यात द्यावे लागते. बँकेत त्यांना वेळेत खायला प्यायला न मिळाल्याने बी.पी.,शुगर अशा आजारांना वाढण्यास मोकळीस मिळते. व पर्यायाने वृद्ध निराधार लाभार्थ्यांना दीर्घ आजाराला बळी पडावे लागते. अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा उपसरपंच गोपाल मडावी यांनी तहसीलदार साहेब यांच्या समोर वाचला.
दरम्यान,आमच्या प्रसूत प्रतिनिधीला संवाद साधताना उपसरपंच मडावी यांनी सांगितले की, आजपर्यन्त या समस्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्यामुळे आम्हाला या समस्या घेऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी आज तहसील वर लाभार्थ्यांना घेऊन यावे लागले. यावेळी विविध संघटनेने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.