सह्याद्री चौफेर | राजू डावे
यावेळी शांतता कमेटीच्या सदस्यांनी येणाऱ्या सणात वणी शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी काही सुचना केल्या, त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांनी शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही.यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असणार आहे. शहरात शांतता भंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाईल असे आवाहन केले.
ठाणेदार अजित जाधव यांनी सांगितले की न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार मंडळांनी पालन करावे जेणेकरून वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या सपोनि सिता वाघमारे यांनी स्त्रियांना दागिण्यासंदर्भात काही मार्गदर्शन केले.
सभेचे सूत्र संचालन ठाणेदार अजित जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाहतूक शाखेच्या सपोनि सिता वाघमारे यांनी केले.यावेळी शांतता समीतीचे सभासद, पत्रकार व दुर्गाउत्सव मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक उपनिरीक्षक शेखर वांढरे, आत्राम यांच्या सह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.