टॉप बातम्या

मुसळधार पावसाच्या तडाख्यात घर कोसळले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्‍यातील चिंचमंडळ येथील एका शेतमजूराचे  मुसळधार पावसाच्या तडाख्यात घर कोसळण्याची घटना आज 5 वाजता सुमारास घडली आहे. यामध्ये जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.

मारेगाव तालुक्यात पावसाचा दोन ते तीन दिवसापासून जोर वाढल्‍याने शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरु आहे. तालुक्यातील चिंचमंडळ येथे आज शुक्रवारला सायंकाळी पाचच्या सुमारास शंकर रघुनाथ चौधरी (55) याचे घर झालेल्या मुसळधार पावसाने कोसळले आहे. या दरम्यान म्हातारी आई घरात एकटी होती, शंकर बाहेरून आले होते आणि पिण्यासाठी त्याने पाणी मागितलं, त्या पाणी आणायला गेल्या असता धाडकन घर क्षतिग्रस्त झाले. या दुर्घटनेत चौधरी परिवार थोडक्यात बचावले. वृत्त लिहे पर्यंत घटनास्थळी संबंधित कार्यालयामार्फत कोणीही दाखल व्हायचे होते, मात्र नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तालुका प्रशासनातर्फे तत्काळ नुकसान ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अतुल पचारे यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना म्हणाले. ते पुढे सांगतात की, चिंचमंडळ परिसरात कालपासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे या पावसाच्या तडाख्यात चिंचमंडळ गावातील चौधरी यांचे राहते घर कोसळले.

आतापर्यंत मला घरकुल किंवा मला कोणताही शासनाचा लाभ मिळाला नाही, मी मजूर आहे आणि मजुरी करित जीवन जगत असल्यामुळे मला या महागाईच्या काळात मी घर बंधू शकलो नाही. आतातरी मला शासनाची मदत आणि घरकुल मिळावी अशी शासनाकडून अपेक्षा आहे.
 -शंकर रघुनाथ चौधरी
शेतमजूर, रा. चिंचमंडळ 
Previous Post Next Post