सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : जिल्ह्याच्या सीमेवरील तेलंगणाच्या काठावरील गावांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत परराज्यात सामील होण्याची भाषा सुरू केली आहे. पांढरकवडा, वणी आणि झारी-जामनी तालुक्यातील 25 पेक्षा अधिक गावांना तेलंगणा राज्यातील विविध योजनांची भुरळ पडली आहे. तेलंगणा राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारच्या योजना तुकड्या पडत असल्याची ओरड काळात पैनगंगाच्या पट्ट्यातील ही बोलून दाखवत आहेत.
पांढरकवडा तालुक्यातील तेलंगणा सीमेजवळ असलेली एकूण 25 गावं तेलंगणातील योजनांच्या प्रेमात पडली आहेत. दिग्रस येथे पूल झाल्याने तसेच तेलंगणाची परिवहन सेवा मिळत असल्याने येथील नागरिकांना आदिलाबाद ची बाजार पेठ जवळ पडते. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी 24 तास निशुल्क वीज पुरवठा, किसान सन्मान योजने चा लाभ देत प्रति एकर 10 हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जात, त्यामुळे पैंनगंगेच्या पट्ट्यातील 25 गावं तेलगंणाच्या प्रेमात आहेत. अनेकांची शेती या सीमावर्ती भागामध्ये आहे.तिथे मराठीसह तेलगू भाषा बोलली जाते.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्याच्या सीमेजवळील पिंपळखुटी या गावाच्या पाचशे मिटर वर तेलंगणातील डोलारा हे गांव आहे. तेलंगणातील डोलारा गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी केसीआर सरकार 24 तास वीज देते, मात्र महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी कधी दिवसा तर कधी रात्र पाळीत वीज पुरवठा दिला जाते.
सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता
यवतमाळ जिल्ह्यातील २५ गांव तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत
विशेष म्हणजे नैसर्गिक अपत्तीमुळे किंवा आत्महत्या
झाल्यास शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत नुकसान भरपाई देते तर तुलनेत महाराष्ट्र सरकार 1 लाख रुपये देते. मात्र, तेही मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागतो. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी हे महाराष्ट्र राज्यातील शेवटच गांव आहे. पैनगंगा नदीने तेलंगणा आणि महाराष्ट्राला विभागलं आहे. निम्म पैनगंगा धरण पांढरकवडा तालुक्याच्या महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे 26 वर्षांपासून रखडलं आहे, तर त्याच पार्श्वभूमीवर, तेलंगणा सरकारने पैनगंगा नदीवर साडे तीनशे कोटी खर्च करून चणाखा गावाजवळ विराट बॅरेजच काम सुरू केलं. त्यामुळे सीमावर्ती भागातील शेतकरी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त करित आहेत. तेलंगणा सरकारने कमी वेळात प्रगती करत तेथील शेतकऱ्यांना सोयीसुविधा देण्यास प्राधान्य दिलं. त्यानंतर तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील 55 गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ आणि तेलंगाणा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीवर साडे तीनशे कोटी रुपए खर्च करून विराट बॅरेजच काम सुरू केलं.
विशेष म्हणजे हे काम महाराष्ट्राच्या हद्दीत देखील सुरू आहे. मात्र त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना कवडीचाही होणार नाही.
तेलंगणातील या योजनांच आकर्षण, शेतकऱ्यांना 24 तास निशुल्क वीज पुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ, रयतूब बंधू योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी, यात शेतकऱ्यांसाठी प्रति एकर दहा हजार रुपयापर्यंत कर्ज, प्रत्येक गावातील रस्ते विकसित, मुलींच्या लग्नासाठी 50 हजार रुपये, घरकुल योजना प्रत्येकासाठी राबविली जाते. नैसर्गिक अपत्तीमुळे वा आत्महत्या झाल्यास शेतकऱ्यांना 5 लाखापर्यत नुकसान भरपाई.
सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2023
Rating:
