आज 1 मार्चपासून हेल्मेटची सक्ती; RTO ने काढला आदेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ जिल्ह्यात बेफाम वाहन चालविणाऱ्यांचा धुडगूस सुरू आहे. त्यातून वारंवार अपघात होऊन प्राणहानी होत आहे. या प्रकाराला पायबंध घालण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती आज 1 मार्चपासून लागू केली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि पाेलिस दल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार गेल्या वर्षभरात 426 वाहन चालकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या विशेषत: युवा वर्गाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे असे (RTO) सांगण्यात आले.

आज 1 मार्चपासून या नियमाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आजपासून हेल्मेट परिधान करावे लागणार आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईस सामाेरे जावे लागणार असले तरी वणी उपविभागीय क्षेत्रात हेल्मेटची सक्ती किती होईल याकडे बघणे गरजेचे..