सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : वणी ते नागपूर 135 किलोमीटरची पदयात्रा काढून राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या मोर्चाने सोमवारी विधिमंडळावर धडक दिल्ली. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या झालेल्या नुकसानीचे त्यांनी पाढेच वाचले. या मोर्चासह ग्रामरोजगार सेवक, वीज कर्मचारी, व्यवसाय शिक्षक, बांधकाम मजूर, वस्तीगृह कर्मचारी, परिवहन कर्मचारी, आदिवासी विद्यार्थी, आंबेडकरी विचार मोर्चा, भूमिहीन शेतकरी, आदी 15 संघटनांनी मोर्चातून आपल्या मागण्या रेटून धरल्या.
महाराष्ट्र राज्य लाल बटवा शेतमजूर युनियनच्या बॅनरखाली 21 डिसेंबर रोजी वणीहून शेतकरी, शेतमजुरांचा निघालेला मोर्चा सोमवारी नागपुरात धडकला. मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांनी अडकविल्यानंतर त्यांच्ये सभेत रूपांतर झाले. धरणातील पाण्याचे व्यवस्थापन, कोळसा खाण व्यवस्थापनात उभारलेले वर्धा नदीच्या काठावरील मातीचे ढिगारे, थर्मल पॉवर स्टेशनचे राख व्यवस्थापन, जलयुक्त शिवार योजनेतील अशास्त्रीय कामे आणि पुरामुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या हानीबाबत न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करा व आपदग्रस्तांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी लावून धरण्यात आली.
'प्रधानमंत्री पीक विमा योजने' अंतर्गत असलेले ॲडव्हान्स नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. यामुळे 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात झाल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी मोर्चाचे निवेदन महसूल मंत्री रामकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आले. त्यांना मागन्यांसाठी मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
युनियनचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, राजन क्षीरसागर, अरुण बनकर, हिरालाल परदेशी, अनिल घाटे, हौसलाल राहंगडाले, गणेश कसबे, शिवकुमार गणवीर, राम बाहेती, अमृत महाजन, आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
मागण्या : • पुरामुळे झालेली जीवित हानी व मालमत्तेच्या हानीबाबत न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन करा • आपदग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या • तेलंगणाच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करा • पूर्व अतिवृष्टीमुळे बाधित पीक नुकसानीबाबत पिक विमा जोखीम रक्कम इतकी एमडीटी द्या • रकटून गेलेल्या सर्व जमिनीचे पंचनामे करा • हेक्टरी 40 हजार रुपयांची मदत करा • वनाधिकार कायद्यानुसार वनजमीनधारकांना पट्टे द्या • चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व रानटी पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या 50 मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अभयारण्य सफारी बंद करा, सर्व प्रकल्पातील कालवा दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू करा, १८ तास वीज पुरवठा करा.