कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
जिल्ह्याला पावसाने झोडपलं आहे व आता कर्मचारी झोपत आहे. शेतकऱ्यांची अवस्था "आकाश से गिरा आणि खजूर मे लटका" अशी परिस्थिती झाली आहे. प्रत्येक तालुक्यात अनुदान प्राप्त झाले परंतु कृषी व महसूल यांच्या चुकी मुळे अडकलेले आहे तरी, हा तिढा लवकरात लवकर सोडवून शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळावा याकरिता मारेगाव नगरपंचायत चे नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रविंद्र पोटे, अतुल वटे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, समीर कुडमेथे, धिरज डांगाले हे उपस्थित होते.