विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : शासनाने गोरगरीब जनतेला अल्पदरात धान्य उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासन मान्य राशन दुकानदाराकडून वाटपाला दिले. गेली अनेक वर्षांपासून एकाच दुकानदारांना राशन चे धान्य वाटपाचा पुरवठा दिला आहे. शासनाच्या अनेक अनागोंदी कारभारामुळे आज पर्यंत या दुकानदाराने भरमसाठ शासनास लुटले आहे. परिणामी दुकानदार भ्रष्टाचार करित असल्याने वनोजा येथील रेशन दुकानदाराची भ्रष्टाचार कारभाराची चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना केली.
शासनाने गोरगरीब जनतेला राशन वाटपासाठी शासनमान्य परवाने दिली, मात्र परवानाधारक दुकानदारांनी गोरगरीब जनतेवर अन्याय करत असल्याच्या तक्रारी याआधी करण्यात आल्या. जसजसा काळ बदलत गेले तसतसं शासनाने पुरवठा विभागात सुधारणा करत अनेक उपाय योजना करीत राहिले तरीही पुरवठा विभाग व दुकानदार यांनी पळवाट काढत मोठी आर्थिक कमाई चालूच राहिली. शासनाने व पुरवठा विभागाने राशन दुकानदारांना अनेक नियम व अटी घालून देऊनही कोणतीही तंतोतंत पालन होत नाही.
लाभार्थ्यासाठी देण्यात आलेली मशीन केवळ नावालाच असून मशीनमधून निघालेल्या पावती प्रमाणे पैसे न घेता आगाऊ पैसे घेणे, तीन चार वर्षांपासून मयत झालेल्याच्या नावाने राशन उचल करून बाजारात विकणे, दक्षता समितीचा फलक न लावणे, राशन दुकानाची नेमकी वेळ कोणती या संदर्भाचा फलक न लावणे, दुकानावर कोणतेच भाव फलक व धान्य किती वाटप आहे हे फलक न लावणे, अन्न धान्य खरेदीची पावती न देणे अशा अनेक अडचणीमुळे सामान्य शिधापत्रिकाधारक हतबल झाला आहेत.
तक्रार करावी तर कोणाकडे असा प्रश्न ?सामान्य नागरिकांना पडला आहे. काही जागरूक नागरिक या दुकानदाराला आळा घालण्यासाठी तक्रारीचे पाऊल उचलले असून, यासंदर्भात या आधी ही तक्रारी करण्यात आल्या आहे. परंतु संबंधिताशी हातमिळवणीने या दुकानदाराचे फोफावत असून दिलेल्या निवेदनातून तक्रारीची गांभीर्याने दाखल व्हावी अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करून दोषी दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, यासाठी आज दि.22 ऑगस्ट रोजी वनोजा देवी येथील ग्रामस्थांनी स्वाक्षरीसह मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना हरिदास नगराळे, संभा बहिरे, बंडू पुनटकर, गोवर्धन टोंगे, प्रशांत भंडारी, गंगाधर कडुकर, अनिल बहिरे, गजानन आत्राम आदींची उपस्थिती होती.