वणी वाहतूक शाखेकडून 32 लाख 27 हजाराचा दंड वसूल

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : बेशिस्त वाहनचालकांना वणी वाहतूक शाखेचा दणका, 32 लाख 27 हजाराचा 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही वणी वाहतूक शाखेची उत्तम कामगिरी मानली जात आहे.

वाहतूक उप शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम यांनी शाखेतील अधिनस्त कर्मचारी यांनी मागील पाच महिन्यात मोटर वाहन कायद्या अंतर्गत वणी उपविभागातून 7888 केसेस करण्यात आल्या,त्यात तडजोड केसेस 7733 मधून 32 लाख 27 हजार 500 रुपये, दंड वसुल करण्यात मोठे यश आले.
अवैध प्रवासी वाहतूक व ड्रॅंक अँड ड्राइव्ह अंतर्गत 155 प्रकरण विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी कोर्टातून 1 लाख 35 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. शहरासह तालुक्यात अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याने नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक शाखेने दणका दिला आहे. ट्रक चारचाकी व दुचाकी वाहन चालक मद्य ढोसून वाहन चालवीत असल्याचे आढळून आले आहे. 
शिवाय टोल नाका वाचविण्यासाठी अवजड वाहन वणी शहरातून जात असल्याने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम यांनी लालगुडा रोड वरील जंगली पीर बाबा दर्गाजवळ बॅरिकेड (Barricade) लावून शहरात येणाऱ्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईचा बडगा उगारला.
 मा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनाखाली वणी वाहतूक शाखा उपविभाग हे कार्य बजावीत आहे.