काव्यांगण साहित्य मंचा तथा बहुउद्देशीय संस्थेद्वारे सिंधुताई सपकाळ (माईंना) काव्यपुष्पातून अभिवादन....
सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा : असंख्य निराधारांचा आधार...पद्मश्री सिंधुताई सपकाळ(माई) ह्यांना काव्यातून मानवंदना देण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावणारे काव्यांगण साहित्य मंच होय.
दि १२/१/२०२२ रोजी दु ४ ते ६.३० दरम्यान गुगलमीटच्या माध्यमातून आँनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात प्रसिद्ध गझलकार मान. संजय घरडे सर हे उद्घाटक म्हणून लाभले. सरांनी आपल्या भारदास्त आवाजात आपल्या काही निवडक गझजेचा नजराणा सादर केला आणि सहभागी सर्व साहित्यिकांना मंत्रमुग्ध केले.प्रा. घरडे सरांनी माईसोबतच्या काही महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी क्षणांनाही आमच्यासोबत उजाळा देत माई विषयीचे आदरार्थी मनोगत व्यक्त केले.
काव्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेल्या काव्यांगण साहित्य मंचच्या उपाध्यक्षा मा. प्रांजली प्रविण काळबेंडे, वसई (काव्यप्रांजू) ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व आयोजक मंडळाचे आभार मानले तसेच माई सोबत त्यांची भेट झाली नाही ही खंत व्यक्त करत त्यांच्या विषयीच्या आदराच्या भावना व्यक्त केल्या.
माईने घेतलेला समाजसेवेचा वसा समाजातल्या प्रत्येक स्त्रीने पुढे नेला तर ती खरी आदरांजली ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करत "ज्योत मालवली..." हि माईवर आधारित स्वरचीत रचना सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना काव्यांगण साहित्य मंचाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.नीरज आत्राम ह्यांनी कविसंमेलनासाठी लाभलेल्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून दिला त्याचबरोबर काव्यांगण मंचाचे धेय्य, उद्दिष्टे सुद्धा स्पष्ट केले. या कविसंमेलनात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मा.रंजीत पवार, मा. प्रल्हाद घोरबांड गुरूजी, मा. राजू पाडेकर सर (काव्यांगण साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष) यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. कविसंमेलनात अनेक कवीं/कवयित्री यांनी सहभाग नोंदवला.
काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था आयोजित
सहभागी कवी/ कवयित्री नावे
निशा महेश कापडे - औरंगाबाद, सुवर्णा पवार - इचलकरंजी, खंदारे सूर्यभान गुणाजी - नांदेड,
गणेश रामदास निकम - चाळीसगाव, रत्नाकर बाबुराव पाटील - उस्मानाबाद, बाबाजी शिंदे - राजगुरुनगर,
सौ. महानंदा मल्लिकार्जुन बागेवाडी - सोलापूर,
सौ. रेखा वाल्मिक मराठे - अमळनेर, प्रणोती शेंडे - यवतमाळ, राऊत वैष्णवी दत्तात्रय - बीड, सौ. रेणुका नागेश तिळकरी - औरंगाबाद, श्री. लक्ष्मण शिंदे - भोर,
बबन पाटील - नांदेड, रावजी पंढरीनाथ पेंदे - नांदेड,
सौ. मेहमूदा शेख - देहुगाव, अविनाश खरे - पुणे,
अनिता भोसले - कोल्हापूर, सुजाता पुरी - अहमदनगर,
सौ. मेघना संपत वैराळ - पालघर, सौ. स्मिता कुलकर्णी - सांगली, संदीप शिवाजी जंगम - कोल्हापूर, संगिता रघुनाथ वाडेकर - पुणे, श्रीमती रेखा पाटील - धुळे,
अंजली वारकरी - अमरावती, कविता बिरारी - नाशिक,
सौ. प्रिया त्रिंबक भालके (महाजन) - नांदेड,
सौ. मनिषा मानवतकर - नांदेड, सौ. स्वाती शशिकांत यादव - सातारा, सौ. वीणा सारंग व्होरा - सोलापूर,
कवयित्री, सौ सुरेखा ताई काळे - सोलापूर, सौ. सुवर्णा रमेश तेली - सांगोला, प्रा. विरशाह आत्राम - वरोरा, सौ. शुभांगी माळी - नाशिक, विशाल टर्ले - नाशिक,
सौ. कल्पना संजय गायकवाड - अमरावती, श्रीमती अर्चना गरुड - नांदेड, मंगेश शिवलाल बरई - नाशिक, दीपक केदू अहिरे - नाशिक, सौ. कविता बाविस्कर - शिरपूर, श्रीमती सुलोचना लडवे - अमरावती, नितीन अरुण डोंगरे - सोलापूर, अंजुम अकिल शेख - भिवंडी, सौ.वर्षा अनिल शेंडे चंद्रपूर, कु.प्रणाली ढवस, वरोरा, आदींनी सहभाग नोंदवला.
या कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कवयित्री कु.वृषाली राऊत ह्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. एकाहून एक उत्तम कवितांचा दरवळ या साहित्यिक महफलित बघायला मिळाला.
माईचा संपूर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा करणारा हा समारंभ जरी साश्रू नयनांनी सुरू झाला तरी माईच्या करारी,प्रेरणादायी कार्याचा आढावा घेत घेत ..एका संकल्परूपी,व्रतधारी,स्मिताने संपन्न झाला.
माईच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...या कार्यक्रमाचे आभार श्री,प्रल्हाद घोरबांड यांनी सर्व मान्यवर तथा सारस्वतांचे मानले.
या कार्यक्रमच्या यशस्वितेकरिता काव्यांगण साहित्य मंच व बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष
मा.राजू पाडेकर, अहमदनगर संस्थापिका उपाध्यक्षा
मि.प्रांजली प्रविण काळबेंडे, वसई (काव्यप्रांजू)
संस्थापक कार्याध्यक्ष मा.नीरज आत्राम, चंद्रपूर यांचे हातभार लागले.
काव्यांगण साहित्य मंचा तथा बहुउद्देशीय संस्थेद्वारे सिंधुताई सपकाळ (माईंना) काव्यपुष्पातून अभिवादन....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 15, 2022
Rating:
