सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
या प्रसंगी दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अॅड.मनोहर पाटिल (आनंदवनातील बाबाशाहीचे लेखक) यांचे हस्ते संग्रामयुग कवितासंग्रह व वणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना भ्रम आणि वास्तव या पुस्तिकेची द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन पार पाडताना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.घनश्याम धाबर्डें सर तर, या पुस्तकाचे भाष्यकार म्हणून प्रा.डाॅ. भिमराव गोटे सर व प्रा.राम घोडेस्वार लाभले..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल तेलंग आणि सुत्रसंचालन विजय भगत यांनी केले. तसेच पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार अशोक ऊईके यांनी मानले.
या प्रकाशन सोहळ्याचे दुसरे सत्र दुपारी तीन वाजता सुरू झाले.दुसर्या सत्रात वर्तमान परिस्थितीतील औद्योगिक करण आणि दलित, आदिवासी,ओ.बी.सी व अल्पसंख्याक समाजातील प्रश्न आणि उपाय यावर सखोल मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.घनश्याम धाबर्डें सर तर वक्ते अनिल तेलंग व प्रा भिमराव गोटे सर होते.चर्चासत्राचे संचालन विजय भगत सर तर प्रास्ताविक मिलिंद कांबळे यांनी तसेच आभार विकास खामणकर यांनी मानले.
या प्रकाशन सोहळा व चर्चा सत्रात वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर समुहातील वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजत सातपुते, गौरव जवादे, कृपाशील तेलंग, विकास खामणकर, अशोक ऊईके, सुभाष भगत यांनी प्रयत्न केले.