सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
मारेगाव : वाळू तस्करांकडून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक, मनमानी भावाने विक्री व साठा करण्यात येत आहे. मात्र, वाळू तस्करांच्या अवैध वाहतूक व साठ्यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे मारेगाव, मार्डी परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू आहे. उल्लेखनीय बाब अशी की,ह्या आपटी घाटातून रात्री दहा वाजता च्या नंतर किंबहुना रात्रीस खेळ चालतो अशी माहिती आहे. पोलीस वाहतूक प्रशासन व महसूल विभागाचे हितसंबंधामुळे हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरु असल्याची तक्रार नागरिकांकडून माध्यमांकडे होत आहे. परिणामी वाळू तस्करीच्या वाहनाच्या सुसाट वेगान अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतुकीला गोरखधंदा आपटी लगत असलेल्या वर्धा नदीवरून परिसरात सध्या फोफावताना दिसत आहे. नदीपात्रातील आपटी डेपो मधून घाटावरून तसेच वर्धा नदीच्या अनेक ठिकाणाहून दररोज अवैध वाळूची मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या दरम्यान राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. ह्या चोरटया वाहतुकीकडे संबंधित स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे तस्करांचे चांगलेच फोफावत आहे. परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडून नुकसान होत आहे. याच अवैध वाहनांच्या सुसाट वेगाने व विनाक्रमांक धावणारे ट्रॅक्टरने या मार्गाची दयनीय होत आहे. वाळू तस्करांच्या वाढत्या दहशतीमुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांच्या 'मधुर संबंधामुळे सर्वकाही सुरळीत सुरू असल्याची खंत परिसरातील नागरिकातून व्यक्त होत आहे. सध्या वाळूपट्ट्यांचे यवतमाळ जिल्ह्यात काही डेपो निर्माण करण्यात आले आहे परंतु सर्वसामान्यांना घर बांधकामाधाठी वाळूचे नियम ठरवलेले असून मात्र, रात्री होणारी वाळूची चोरटी वाहतूक ही फक्त तस्करासाठीच आहे का? शासनाने सर्वसामान्य जनतेला निकष लावलेले आहेत याचाच फायदा घेत वाळू तस्कर प्रशासकीय कर्मचारी अधिकारी तसेच पुढऱ्यांना हाताशी धरून रात्रीच्या वेळी आपटी या रेती घाटावरून राजरोसपणे सर्रास वाळूची वाहतूक सुरू आहे. मागणीनुसार वाळु विक्रीचा गोरखधंदा जोमात आल्याने त्यासाठी या तस्करांनी रात्रीची वेळ निवडली आहे. रात्री उशिराने सुरू होणारा हा प्रवास पहाटेपर्यंत चालतो. मात्र, इतर मंडळी (प्रशासकीय) जरी या प्रकरणांपासून 'अनभिज्ञ' असली तरी स्थानिक रहिवासी मात्र नक्कीच या प्रकरणापासून अनभिज्ञ नाहीत. नागरिकांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांकडे धाव घेउन हे प्रकरण प्रकाशझोतात घेऊन येण्यासाठी पुढाकार घेतला असून मात्र, तस्करांचा पोलिस प्रशासनाचा ससेमिरा नको म्हणून अनेकजन नाव न घेणास असमर्थता दाखविली आहे.
अनेक नागरिकांच्या मोबाइलमध्ये अवैध वाळू तस्करांच्या गोरखधंद्याचे चित्रीकरण उपलब्ध असल्याचे नागरिक सांगतात, हे तेवढंच खर आहे. तेव्हा ही अवैध वाळू तस्करी ला आळा केव्हा घालणार तसेच अवैध तस्करीचे ही वाहने खूप सुसाट वेगाने जातात. त्यामुळे अपघातातही वाढ होत आहे तेव्हा त्या सुसाट वेगात धावणाऱ्या वाहनांना निर्बंध कोण लावणार? याकडे मार्डीसह वनोजा देवी परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
आपटी घाटात "रात्रीस खेळ चाले"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 13, 2024
Rating: