सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी च्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, दि.२७/१/२०२३ रोजी वर्तमानपत्राद्वारे संस्थेमध्ये आर्थिक घोटाळा करणारे व संस्थेतून कायम निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी व अभिकर्त्यांनी यवतमाळ येथे पत्रपरिषद घेवून पतसंस्थेविरुद्ध अफवा पसरवली. त्या अफवावर सभासद व ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये. असे परिपत्रक माध्यमातून दि.७ फेब्रुवारी ला जारी केले आहे.
परीपत्रकात पुढे असेही नमूद केले आहे की, आमच्या पतसंस्थेत ज्या ठेवी आहेत, त्या सुरक्षित आहेत. पतसंस्थेत जी ग्राहक व ठेवीदारांची गर्दी होती. ती गर्दी अफवाची शहानिशा करण्यासाठी होती. आता ग्राहकांनी व ठेवीदारांनी केलेल्या शहानिशेनंतर ग्राहकाचा व ठेवीदारांचा पतसंस्थेवरील विश्वास कायम झाला आहे. ज्या ठेवीदारांच्या ठेवी ची मुदत संपली आहे, ते ठेवीदार आपल्या ठेवी पूर्ववत संस्थेमध्ये दीर्घ मुदतीसाठी जमा करित आहेत. तसेच ज्यांची मुदत संपली आहे त्यांना त्यांच्या मागणीनुसार आमची पतसंस्था रक्कम परत करित आहे. संस्थेमध्ये आर्थिक घोटाळे केल्यानंतर संस्थेतून कायम निलंबित केलेल्या कर्मचारी व अभिकर्त्यांनी पतसंस्थेची नाहक बदनामी करत ठेवीदारांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पतसंस्था न्यायालीन कार्यवाही करित आहे.
आमच्या पतसंस्था वर आपण जो आजपर्यंत विश्वास ठेवला, तो विश्वास पुढेही असाच ठेवून पतसंस्थेला सहकार्य करावे असं त्यात म्हटलं आहे. असे जाहीर आवाहन श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांनी केले आहे.