लिखीत आश्वासन डावलण्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे व उपोषण

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : बीएस इस्पात मार्की मांगली कोळसा खाण कंपनीच्या प्रदूषणामुळे लिज क्षेत्रातील खरेदी न केलेल्या शेतजमिनीचे पिकांचे मागिल ७ वर्षापासून नुकसान होत आहे. त्यामुळे या शेतजमीनी त्वरित खरेदी करण्यासाठी एका वर्षापूर्वी आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळी बी एस इस्पात कोळसा कंपनीने लिखीत आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता न करता लिखीत आश्वासन डावलण्याने शुक्रवारी सकाळी 10 वाजता पासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेटच्या बाजूला धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.
कंपनीचे व्यवस्थापक अजय प्रजापतीने मागील उपोषणचे वेळी दि. 27 डिसेंबर 2021 ला सर्व प्रकल्पग्रस्ताना लिज क्षेत्रातील उर्वरित जमिनी 11 डिसेंबर 2022 पर्यंत खरेदी करण्याचे लिखित आश्वासन पत्र दिले होते. परंतु एक वर्षानंतर ही कंपनी व्यवस्थापक जमिनी खरेदी करुण घेण्यास टाळाटाळ करीत आहे. मागिल सात वर्षापासून कंपनी प्रदूषणामुळे लिज क्षेत्रातील खरेदी न केलेल्या जमिनीत शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. सात वर्षापासून प्रकल्पग्रस्ताना पिकाची नुकसान भरपाई मिळलेली नाहीत. प्रशासन विभाग निवेदनाला केराची टोपी दाखवीत आहे.
3 जानेवारी 2023 पर्यंत कंपनीने लिज क्षेत्रातील उर्वरीत जमीनी मार्केट रेटच्या चार पट मोबदला देऊन व रोजगार देऊन त्वरीत खेरदी करावी व मागिल सात वर्षापासूनचा पिक नुकसान भरपाई रकम कंपनीने द्यावी पूर्ण करावे. अन्यथा 10 जानेवारी 2023 पासून संपूर्ण मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त शेतकरी कूटूंबीयांना परिवारासोबत रस्त्यावर येणार असून कंपनीचे गेट समोर मूकूटबन पाटणबोरी रोडवर बेमुदत बेधडक चक्काजाम रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या जनतेच्या शारिरिक व मानसिक त्रासाला व इतर नुकसानाला कंपनी व प्रशासन स्वतः सर्वस्वी जबाबदार जबाबदार राहील असा इशारा धरणे व उपोषण करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
या बाबत 27 डिसेंबर ला जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी केळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी केळापूर, तहसिलदार झरी, पोलीस अधिकारी मुकूटबन, ग्रामपंचायत मुकुटबन व बीएस इस्पात मार्की मांगली बीएस इस्पात मार्की मांगली कोळसा खाण कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन देऊन माहिती दिली होती परंतु बेतालपणे वागणाऱ्या कोळसा खाण कंपनीच्या व्यवस्थापकाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बोचऱ्या थंडीत वाऱ्यावर सोडले.