शासनाचे शंभर टक्के अनुदान आम्हाला द्या- अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी


   

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : माहे जुलै ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. परंतु प्रती हेक्टरी अनुदान नावाने आमच्या खात्यात अजूनपावेतो पूर्ण मिळाली नाही. ते शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळावे अशा आशयचे निवेदन तहसीलदार पुंडे यांना देण्यात आले.
यावेळी मागणी कर्ते प्रवीण बलकी, योगीराज बलकी, गणेश धोबे, किशोर खंडाळकर, राजू डावे,अविनाश बलकी,संजय बलकी,मनोज निखाडे,रविंद्र बोढे,हरी परचाके,सुभाष तिखट, प्रफुल जुनगरी,अनिकेत सोनेकर, दामोदर किनाके, रुपेश भरणे, यशवंत भरणे, राहुल किनाके, नितीन खंडाळकर, प्रशांत वाढई, वासुदेव परचाके, रविकांत वाढई यांची उपस्थिती होती. तालुक्यातील अतिवृष्टीबाधितांना सण 2022 या खरीप हंगामात माहे जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने व पूर बुडीने अक्षरशः शेती पाण्याखाली जावून मोठे नुकसान झाले. यासाठी शासनाने अनुदान देण्याचं घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार अशी आशा असतांना प्रशासन स्तरावर एकमेकांवर चालढकल करून काय कागदीघोडे नाचवले हे कळायला मार्ग नसून दिवाळी पूर्वी अनुदान खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली हे खरं असतांना मात्र, शंभर टक्के मदत न मिळता तटपुंजे अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी निवेदनातून आम्हाला शासनाचे शंभर टक्के मंजूर अनुदान देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली, शिवाय सदर बाबीस दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे आता निवेदनाची दखल घेतील का? दोषीवर कारवाई होईल का? याकडे लाखापूर, आकापूर व डोलडोंगरगांव सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.