अमृत महोत्सवी वर्षा निमित्य नरसाळा ग्रामपंचायती तर्फे वृक्षारोपण


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा नरसाळा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य पदाधिकारी यांनी या अमृत महोत्सवी  वर्षाची समस्त गावकऱ्यांना सतत आठवण रहावी म्हणून गाव सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने गावाच्या मुख्य द्वारापासून ते हनुमान चौक पर्यंत वृक्षारोपण करण्यात आले.

सदस्य शारदा पांडे, सदस्य धनंजय तोडासे, सचिव सचिन पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला रोगे, अंगणवाडी सेविका भारती खाडे, अंगणवाडी सेविका सविता गोवर्धन, चिडे सर, डोंगरकर सर, आशा वर्कर जयश्री भुसारी, व गावातील नागरिक बाबाराव खाडे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वृक्ष मोठे होई पर्यंत सर्व जबाबदारी ही ग्रामपंचायत घेणार असून गावकऱ्यानी सुद्धा "माझं गाव माझं झाड" असा संकल्प करून वृक्षाची जोपासना करावीत अशी अपेक्षा येथील सरपंच संगीत मरस्कोल्हे यांनी व्यक्त केली. झाडे मोठी झाली तर येथील नागरिकांना सावली मिळेल त्यापासून पुढील पिढीला फायदा होईल व गावातील वातावरण नैसर्गिक वाटेल करिता सर्व नागरिकांनी लावलेल्या झाडाची जोपासना करण्यास सहकार्य करावेत तसेच या मुळे अमृत मोहत्सव वर्षाची आठवण स्मरणात राहतील.

सरपंच संगीत मरस्कोल्हे यांच्या हस्ते झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच उपसरपंच यादव पांडे यांनीही झाड लावून झाडाची जोपासना केली जातील असे मत व्यक्त केले.