सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१० ऑक्टो.) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात लखीमपुर येथे चालू असलेल्या शांतप्रिय आंदोलनकर्त्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडण्यात आले.
देशाच्या इतिहासात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली.
त्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालय चंद्रपूर रोड दुर्गा मंदिर मूल येथून उद्या सोमवार दि.११ ऑक्टाेंबरला बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान त्यांनी मूल बंदची देखिल हाक आज दिली आहे.